भारतीय वंशाच्या वळुंची सक्तीने कत्तल करण्यात आली. परदेशातुन प्रचंड मोठ्या प्रमाणावर जर्सी, होल्स्टेन फ्रिजियन या घाणेरड्या प्राण्यांचे वीर्य आयात करुन त्या वीर्यामार्फत देशी गायी भरवुन त्याना नासविण्यात आले. खेडोपाडी असे वीर्य पाठविण्यासाठी एसटी बसेस ची मदत घेण्यात आली. खाजगी पशुवैद्यक डॉक्टराना देशी गायीला एका वेळी जर्सी प्राण्याच्या विर्याने भरविण्यासाठी पाचशे रुपये व संकरीत (नासविलेले) वासरु जन्मल्यावर एक हजार रुपये देण्यात आले. संबंधीत शेतकरयाना देखील पैश्याचे अमिष दाखविण्यात आले. हा सर्व पैसा परदेशी कंपन्यांचा होता. हा प्रकार अजुनदेखील सुरु आहे. सर्व बाजुनी प्रयत्न करुन भारतामधुन देशी गाय नष्ट करायची यावर लक्ष केंद्रीत केले गेले. दुर्देवाने हा कट 99% यशस्वी झाला असुन आता फक्त आपल्या देशात 1% देशी गायी शिल्लक आहेत. यामुळे आपल्या राष्ट्राचे कधीही भरुन न येणारे आतोनात नुकसान झाले आहे. संकरीकरण थांबले नाहीतर पुढील 5 वर्षात शिल्लक असलेल्या देशी गायी देखील नामशेष होतील व त्याना फोटोमधे पाहण्याची वेळ येइल. बाहेरुन देखावा करण्यासाठी देशी गायींचे संकरीकरण दुधाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी करत असल्याचा कांगावा करण्यात आला. पण हे सपशेल खोटे आहे कारण संकरीकरणामुळे गायीचे दुधाचे उत्पादन वाढलेलेच नाही. पुर्वीच्या शुध्द देशी गायी भरपुर दुध देत होत्या त्या नामशेष केल्या गेल्या. देशी गायींचे शुध्द बीज (वळु) नष्ट केले गेले. त्यांच्या खाद्याकडे दुर्लक्ष केले गेले. कृषी शिक्षणातुन देशी गायी दुध देत नाहीत त्यामुळे त्यांचे culling (कत्तल) करुन जर्सी होल्स्टेन फ्रिजियन हे प्राणी पाळले पाहीजेत असे विद्यार्थ्यांच्या मनावर चुकीच्या पध्दतीने बिंबविले गेले. संकरीकरणामुळे दुध विषारी व रोगकारक बनले. आजही देशाच्या दुग्ध उत्पादनात साठ टक्क्यांहुन अधिक वाटा म्हशींच्या दुधाचा आहे. मग गायींचे संकरीकरण करुन काय साध्य झाले ?? भारतीय गीर (काठीयवाडी) गाय ब्राझीलमधे एका दिवसाला 64 लिटर दुध देते. केनिया सारख्या मागास आफ्रिकन देशातील शास्त्रद्न्यानी भारतातुन गीर गायी नेउुन त्यांचे शुद्ध स्वरूपात जतन करुन एका गीर गायीपासुन दिवसाला ५६ लिटर इतके दुध उत्पादन मिळविले आहे . भारतीय गीर गायीला जगामधे सर्वात जास्त दुध देणारी गाय म्हणुन जागतिक मान्यता मिळाली आहे. मग प्रश्न असा पडतो की आपल्याला जर दुधाचे उत्पादन वाढवायचे होते तर मग देशी गीर, लाल सिंधी, साहीवाल, कांकरेज या भरपुर दुध देणाऱ्या देशी गायींचा शेतकऱ्यांमधे का प्रसार केला नाही ?? शासकीय योजना राबवुन गीर गायी शेतकरयाना का दिल्या नाहीत ??संकरीकरण करुन देशी गायी नासविण्याची काय गरज होती ?? आश्चर्य म्हणजे गेल्या पन्नास वर्षात भारतातुन देशी गायी अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया या देशान्मधे मोठ्या प्रमाणावर नेण्यात आल्या. तेथे त्यांचे शुध्द स्वरुपात उत्तम संगोपन करण्यात आले. भारतातुनच नेलेल्या देशी गायी हे देश आंतरराष्ट्रीय बाजारात एकाला गायीला तिन ते चार कोटी या किमतीला विकत आहेत. मुळ भारतातुन नामशेष केलेली ब्राह्मण ही भारतीय देशी गायीची जात आज अमेरिकेत आहे. अमेरिका या गायीला करोडो रुपये घेउन ऑस्ट्रेलिया, मलेशिया या देशाना विकत आहे. *मलेशियाच्या राष्ट्रीय कॅलेंडर मधे भारतीय देशी गायीला स्थान दिले आहे. प्रत्येक भारतीय गायीच्या जातीवर संशोधन करणारया कंपन्या ब्राझील, अमेरिकेमधे कार्यरत आहेत. अमेरिकेने भारतीय गायींवर संशोधन करण्यासाठी दहा हजार कोटी रुपये खर्च करुन संशोधन प्रकल्प सुरु केला आहे. अमेरिकेमधे भारतीय गायीचे दुध ( A2 milk ) नावाने मोठमोठ्या मॉलमधुन विक्री केले जात आहे. आपल्या देशातील कृषी शास्त्रज्ञ मात्र देशी गाय आणि जर्सी् प्राणी यामधील फरक व जर्सीच्या दुधाचे घातक परिणाम जाणुनबुजुन धोरण ठरविणारया राज्यकर्त्यांच्या लक्षात आणुन देत नाहीत आणि खरे वास्तव जनतेपासुन लपवुन ठेवत आहेत. जर्सीचे दुध पिल्याने भारतातील मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आज जगातील सर्वातजास्त मधुमेही रुग्ण भारतात आहेत. ज्या ज्या घरी संकरीत जर्सी होल्स्टेन यांचे दुध पिले जाते तिथे हमखास मधुमेहाचे रोगी तयार झाले आहेत. अगदी चार पाच वर्ष वयाच्या लहान मुलान्मधे देखील मधुमेह रोगाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मुळ जर्सी होल्स्टेन फ्रिजियन हे प्राणी 1.5 ते 2 टन वजणाचे असतात. त्यांच्या वासराचे वजन 22 किलो असते .देशी गायीचे वजन ५०० किलोअसुन वासराचे वजन ११ किलो असते. ज्यावेळेस देशी गायीचा जर्सी सोबत संकर केला जातो तेव्हा २२ किलो वजनाचे संकरित वासरू गायीला ९ महीने पोटात वागवावे लागते. गायीला विताना प्रचंड त्रास होतो. कित्येक गायींचे विताना अंग बाहेर पडते.अनेकदा गायी मरण पावतात. संकरीकरणाचा देशी गायीच्या प्रजनन संस्थावर अतिशय वाईट परिणाम होतो.
देशात सध्या दररोज लाखो देशी गायींचे संकरीकरण करुन त्याना नासविण्यात येत आहे.असा अनैसर्गिक प्रयोग होणारा जगातील एकमेव प्राणी म्हणजे भारतीय देशी गाय होय.देशी गाय भारतातुन संपविण्याचे हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे.
हे संकरीकरण असेच चालु राहीले तर येत्या पाच वर्षानंतर मुळ देशी गायी नामशेष होतील व जर्सीसारखे घाणेरडे प्राणी गाय म्हणुन सांभाळण्याची वेळ जनतेवर येइल.म्हणुन संकरीकरण तातडीने बंद होण्याची गरज आहे तरच कायद्याचा गोरक्षणाचा मुळ उद्देश सफल होइल.
धक्कादायक बाब म्हणजे गेल्या पाच दशकात ब्राझील , अमेरिका ,ऑस्ट्रेलिया ,मलेशिया या देशांनी भारतातुन देशी गायी नेउन त्यांचे शुद्ध रुपात उत्तम संवर्धन केले आहे.ब्राझीलमधे 60 लक्ष शुध्द भारतीय गीर गायी आहेत.तर भारता फक्त तिन हजार शुध्द गीर गायी शिल्लक आहेत. ब्राझीलच्या शास्त्रज्ञांनी गीर गायीची शुध्द रुपात उत्तम जोपासना करुन दिवसाला 64 लिटर इतके दूध उत्पादन साध्य केले आहे. ब्राझीलच्या एकुण दुध उत्पादनामधे भारतीय गीर गायीचा 80% वाटा असुन देशाची अर्थव्यवस्था भारतीय गायींच्या आधाराने उभी केली आहे. ब्राझील जागतिक बाजारात भारतीय गायी ब्राझीलीयन कॅटल
नावाने विकत आहे.
या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करुन संकरीकरणावर तातडीने बंदी आणून भारतीय देशी गाय वाचवणे काळाची गरज आहे.नाहीतर निसर्गाचा हा अनमोल ठेवा आपण कायमस्वरुपी गमावुन बसू.
……………………………………………………………………..
संकरीकरण थांबवा, देशी गाय वाचवा.
Source :-
संकलन रमेश मानकर
गौ सेवा विभाग प्रमुख नाशिक
……………………………………
जास्तीत जास्त लोकांना हे सत्य कळवावे ही विनंती (शेवटी आईचे आणि देशी गाईचे दूधच महत्वाचे )
शेतकरी बंधू आणि जनहितार्थ
Social: –
Youtube – https://www.youtube.com/channel/UC4zKeFoQZbkvvrizFwen6rQ
Facebook – https://www.facebook.com/gosrushti.a2milk/
Instagram – https://instagram.com/gosrushtiecoorganics?igshid=pn5hzegvrfus